ज्या अपघातामध्ये मोटार वाहन सामील आहे, असा कोणताही अपघात घडल्यास, राज्य शासनाने या संदर्भात अधिकार दिलेली कोणतीही व्यक्ती, मागणी केल्यास आपले अधिकारपत्र सादर करून, वाहनाची तपासणी करू शकते आणि त्यासाठी कोणत्याही वाजवी वेळी, वाहन जेथे असेल त्या जागेत प्रवेश करू शकते आणि तपासणीसाठी वाहन हलवू शकते:
अट अशी आहे की, ज्या ठिकाणी वाहन हलवले आहे, त्या ठिकाणाबद्दल वाहन मालकाला माहिती दिली जाईल आणि औपचारिक पूर्तता झाल्यावर वाहन मालकाला, चालकाला किंवा वाहनाच्या प्रभारी व्यक्तीला चोवीस तासांच्या आत परत केले जाईल.