(1) यथास्थिती, जिल्हा आयोग किंवा राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग, तडजोड अहवाल प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत, अशा ग्राहक विवादाच्या तडजोडीची नोंद घेऊन योग्य आदेश पारित करील आणि त्यानुसार प्रकरणाची विल्हेवाट लावील.
(२) जेव्हा ग्राहक विवाद अंशतः निकाली काढला जातो, तेव्हा जिल्हा आयोग किंवा राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग, यथास्थिती, अशा प्रकारे निकाली काढलेल्या मुद्द्यांच्या निपटाऱ्याची नोंद करील आणि अशा ग्राहक विवादात समाविष्ट असलेल्या इतर मुद्द्यांवर सुनावणी सुरू ठेवील.
(३) जेथे ग्राहक विवाद मध्यस्थीद्वारे निकाली काढता आला नाही, तेव्हा जिल्हा आयोग किंवा राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग, यथास्थिती, अशा ग्राहक विवादात अंतर्भूत असलेल्या सर्व मुद्द्यांची सुनावणी पुढे चालू ठेवेल.