कलम ५८ च्या उप-कलम (१) च्या खंड (अ) च्या उप-खंड (i) किंवा (ii) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या आदेशाने व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती, अशा आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत अपील दाखल करू शकेल:
परंतु असे की, जर सर्वोच्च न्यायालयाची खात्री पटली की, उक्त तीस दिवसांच्या कालावधीत अपील दाखल न करण्यासाठी पुरेसे कारण होते, तर ते उक्त कालावधी समाप्त झाल्यानंतरही अपील दाखल करून घेऊ शकते.
परंतु, पुढील अट अशी की, राष्ट्रीय आयोगाच्या आदेशान्वये कोणतीही रक्कम भरणे आवश्यक असलेल्या व्यक्तीने केलेले कोणतेही अपील सर्वोच्च न्यायालयात दाखल केले जाणार नाही, जोपर्यंत त्या व्यक्तीने त्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम विहित केलेल्या रीतीने जमा केलेली नाही.