जिल्हा आयोगाने पारित केलेल्या आदेशामुळे व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती, अशा आदेशाविरुद्ध राज्य आयोगाकडे, तथ्य किंवा कायद्याच्या आधारावर, आदेशाच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसांच्या मुदतीत, विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व रीतीने अपील दाखल करू शकेल.
परंतु असे की, राज्य आयोग पंचेचाळीस दिवसांच्या उक्त मुदत समाप्त झाल्यानंतरही अपील विचारात घेऊ शकेल, जर त्याची अशी खात्री पटली की, त्या मुदतीत ते दाखल न करण्यासाठी पुरेसे कारण होते.
परंतु पुढील अट अशी आहे की, जिल्हा आयोगाच्या आदेशानुसार कोणतीही रक्कम देय असलेल्या व्यक्तीने केलेले कोणतेही अपील राज्य आयोगाकडून दाखल करून घेतले जाणार नाही, जोपर्यंत अपीलकर्त्याने त्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम विहित केलेल्या रीतीने जमा केलेली नसेल:
परंतु असेही की, कलम ८० अन्वये मध्यस्थीद्वारे झालेल्या तडजोडीनुसार जिल्हा आयोगाने कलम ८१ च्या उप-कलम (१) अन्वये पारित केलेल्या कोणत्याही आदेशाविरुद्ध कोणतेही अपील चालणार नाही.