(1) तक्रार दाखल करून घेतल्यानंतर तिच्या पहिल्या सुनावणीच्या वेळी, किंवा कोणत्याही पुढील टप्प्यावर, जिल्हा आयोगाला असे दिसून आल्यास की, पक्षकारांना मान्य होऊ शकतील अशा समझोत्याचे घटक अस्तित्वात आहेत, तर विहित केलेल्या प्रकरणांव्यतिरिक्त, तो पक्षकारांना प्रकरण ५ च्या तरतुदींनुसार त्यांचा वाद मध्यस्थीद्वारे मिटवण्यासाठी पाच दिवसांच्या आत लेखी संमती देण्याचे निर्देश देऊ शकेल.
(२) पक्षकारांनी मध्यस्थीद्वारे तडजोडीसाठी सहमती दर्शविल्यास आणि त्यांची लेखी संमती दिल्यास, जिल्हा आयोग, अशी संमती मिळाल्याच्या पाच दिवसांच्या आत, प्रकरण मध्यस्थीसाठी निर्देशित करील आणि अशा प्रकरणी, मध्यस्थीशी संबंधित प्रकरण ५ मधील तरतुदी लागू होतील.