(१) जिल्हा आयोग, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग तक्रार दाखल करून घेणार नाही, जोपर्यंत ती दावा कारण उद्भवल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत दाखल केली जात नाही.
(२) उप-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, जर तक्रारदाराने जिल्हा आयोग, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग, प्रसंगानुसार, यांना समाधानकारकपणे पटवून दिले की, त्याला अशा कालावधीत तक्रार दाखल न करण्यासाठी पुरेसे कारण होते, तर उप-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीनंतरही तक्रार विचारार्थ घेतली जाऊ शकते.
परंतु असे की, जिल्हा आयोग किंवा राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग, प्रसंगानुसार, अशा विलंबास क्षमापित करण्याची कारणे नोंदवित नाही, तोपर्यंत अशी कोणतीही तक्रार दाखल करून घेतली जाणार नाही.