(1) जिल्हा आयोगापुढील प्रत्येक कार्यवाही त्या आयोगाचे अध्यक्ष आणि किमान एक सदस्य यांनी एकत्रितपणे बसून चालविली जाईल.
परंतु असे की, जेथे एखादा सदस्य, कोणत्याही कारणामुळे, कोणतीही कार्यवाही ती पूर्ण होईपर्यंत चालविण्यास असमर्थ ठरतो, तेथे अध्यक्ष आणि इतर सदस्य ती कार्यवाही मागील सदस्याने ज्या टप्प्यावर तिची शेवटची सुनावणी केली होती, त्या टप्प्यापासून पुढे चालवतील.
(२) कलम ३५ अन्वये करण्यात आलेली तक्रार प्राप्त झाल्यावर, जिल्हा आयोग, आदेशाद्वारे, पुढील कार्यवाहीसाठी ती तक्रार दाखल करून घेऊ शकेल किंवा ती फेटाळून लावू शकेल:
परंतु असे की, तक्रारदारास सुनावणीची संधी दिल्याशिवाय या कलमाखाली कोणतीही तक्रार नामंजूर केली जाणार नाही.
पुढे असे की, ज्या दिनांकास तक्रार दाखल करण्यात आली, त्या दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत तक्रारीच्या स्वीकारार्हतेवर साधारणपणे निर्णय घेण्यात येईल.
(३) जेव्हा जिल्हा आयोग, अशा विनिर्दिष्ट कालावधीत तक्रारीच्या दादपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय देत नाही, तेव्हा ती दाखल झाली असे गृहीत धरले जाईल.